व्हीएसआरएस न्युज –
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला रेडिओ कार्यक्रम मन की बातमधून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी कृषीक्षेत्रावरही भाष्य केले. नव्या कृषी कायद्यांचाही त्यांनी उल्लेख केला. सरदार पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दलही पंतप्रधान बोलले.
देशभरातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांची प्रशंसा करत त्यांनी पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचा नारा दिला.
मोदी म्हणाले, ‘जेव्हा आपण लोकलसाठी व्होकल होत आहोत तेव्हा जगही आपल्या लोकल उत्पादनांची चाहती होत आहे. असेच एक उदाहरण आहे खादीचे. हे शरीरासाठी चांगले असलेले कापड जगातील अनेक ठिकाणी बनवले जात आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ खादी तयार करण्याचे काम करत आहेत. इतकेच नव्हे तर इथली खादी ओहाका खादी म्हणून प्रसिद्ध झाली आहे. तसेच त्यांनी या सणासुदीच्या दिवसात एक दिवा आपल्या सीमेवर लढणार्या जवानांसाठीही लावण्याचे आवाहन केले.