New Delhi : नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण घोटाळ्यासंदर्भात ईडीने अटक केली असून २८ मार्च पर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने यामुद्द्यावर दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केले आहे. ताच बरोबर या विषयावर दाद मागण्यासाठी दिल्ली उच्चन्यायालयाच याचिका दाखल केली आहे. मात्र, होळीच्या सणानिमित्त न्यायालयाला सुटी असल्याने किमान २७ मार्चपर्यंत तरी केजरीवाल यांना कोठडीतच रहावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, केजरीवाल कोठडीत असल्याने दिल्ली सरकार कोण चालवणार? केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता किंवा त्यांच्या विश्वासू आतिशी या सरकार चालवणार अशी चर्चा माध्यमात सुरू झाली होती. मात्र, जलमंत्रालयाशी संबंधित एक आदेश केजरीवाल यांनी तुरुंगातूनच जारी केल्यामुळे दिल्ली सरकारची सूत्रे ते आपल्याच हाती ठेवणार आणि कोठडीतूनच सरकार चालवणार हे निश्चित झाले आहे. तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्र्याने सरकार चालवण्यास आडकाठी करणारा कायदा नसल्याने कायद्याच्या चाकोरीत राहून सरकार चालवण्याचा हा मार्ग केजरीवाल अवलंबणार असल्याचे दिसत आहे.
Discussion about this post