व्हीएसआरएस न्युज पुणे- ही संचारबंदी 31 मार्च पर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. संचारबंदीमध्ये विशेष नवे निर्बंध लागू करण्यात आले नाहीत. आगोदरचेच निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. या निर्बंधानुसार धार्मिक, समाजिक कार्यक्रमांना पोलीस परवानगी आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयं ही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा आणि या सेवेत येणारी दुकाने नीयमीत सुरु राहतील.
पुणे शहरात लॉकडाऊन लावला जाणार नाही. निर्बंध मात्र अतिशय कडक करण्यात येतील असे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (12 मार्च) सकाळीच स्पष्ट केले होते.
हॉटेल, रेस्टॉरंट्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत होम डिलीव्हरी करण्यास परवानगी आहे. रात्री 10 वाजेपर्यंत ही मुभा असली तरी आसनक्षमतेच्या केवळ 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेशाची मुभा असणार आहे.
विवाह, अंत्यविधी अथवा इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असतील तर त्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. तसेच, या कार्यक्रमामध्ये केवळ 50 लोकच उपस्थित राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. 50 व्यक्तींची मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार.
पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालये 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. त्यासोबतच शाळा महाविद्यालयांशी संबंधीत कोणतेही कोचिंग, क्लासेस सुरु राहणार नाहीत.
शहरातील सर्व गार्डन, उद्याने, बगिचे हे सायंकाळी बंद राहतील. केवळ मॉर्निंग वॉकला उद्यानांमध्ये प्रवेश असणार आहे. उद्यानांमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रीडा अथवा उपक्रमांना बंदी असणार आहे.
एमपीएससी परीक्षा तोंडावर आहे. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी असलेल्या कोचिंग क्लासेसना सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. एमपीएससी परिक्षा (21 मार्च) होईपर्यंत संबंधिक कोचिंग क्लासेस सुरु राहतील. मात्र, इथेही 50 % क्षमतेने कोचिंग क्लासेस सुरु ठेवता येणार आहेत.
दरम्यान, पुण्यात पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार नाही. परंतू, निर्बंध मात्र अतिशय कडक करण्यात येतील असे संकेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच दिले होते. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती आज सकाळीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीस राजकीय नेते आणि आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.