व्हीएसआरएस न्युज पुणे- टोळीप्रमुख सूर्यकांत ऊर्फ बंडु राणोजी आंदेकर (वय 65, रा. स.नं. 31 नाना पेठ) व नंदकुमार बाबुराव नाईक (वय 72, रा. 629, शुक्रवार पेठ) यांना न्यायालयाने 16 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मोक्काचे विशेष न्यायाधिश ए. वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला. याबाबत ओंकार गजानन कुडले (वय 21, रा. 767 गणेश पेठ. सध्या रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणात 11 जणांना यापुर्वीच अटक करण्यात आली असून त्यांना 9 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
21 फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास बांबु आळी परिसरात ही घटना घडली.
पूर्ववैमनस्यातून तसेच टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या कारणावरून आंदेकर याच्या सांगण्यावरून आरोपींनी कट रचला. त्यानंतर, कोयते, पालघण यांसारख्या धारदार हत्यारांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. न्यायालयात युक्तिवादादरम्यान विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी कोठडी देण्याची मागणी केली.