व्हीएसआरएस न्युज प्रतिनिधी-दिल्लीतील हवा प्रदूषणामुळे गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याची दखल घेत दिल्ली, राजस्थान, कर्नाटकसह काही राज्यांनी दिवाळीमध्ये फटका उडविण्यावर बंदी घातली. याच धर्तीवर इतर राज्यांकडूनही फटाक्यांवर बंदी घालण्यासंदर्भात एनजीटीकडे याचिका दाखल झाल्या . या संदर्भात सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या मुख्य न्यायपीठाने हे प्रदूषित शहरांमध्ये फटाके बंदीचे आदेश दिले आहेत.
फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. कोरोनाचाही श्वसनाच्या विकारांशी थेट संबंध असल्याने नागरिकांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) पुण्यासह देशातील सर्व प्रदूषित शहरांमध्ये या वर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदीचे आदेश दिले आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि फटाके वाजविण्यास बंदी असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाला सामोरे जावे लागणार आहे.