व्हीएसआरएस मराठी न्युज –कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियम अटी र्निबंधा मुळे वारी मर्यादित स्वरूप म्हणजेच मोजक्या लोकांमध्ये भरवण्याचे आदेश शासना कडून होते.पंढरपुर वारीला ही लालपरीतून (एसटीतून) मानाच्या संतांच्या पालख्या पादुका गेल्या होत्या.कोरोनामुळ दोन वर्षे पायी वारीत खंड पडला होता. आषाढी वारी कधी येईल .
विठूरायाचे दर्शन भेट कधी होईल,अशी मनात अवघ्या वैष्णवजणांना आस लागली आहे.
कोरोनाच्या दोन वर्ष वारी काळात वैष्णवजन कीर्तन ,प्रवचन ,सप्ताह सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रसारण करून आपली हरिभक्ती ,विठुरायावरील प्रेम कमी न झाल्याची पोच पावतीच देत होते.कोरोनाच्या रूपाने आयुष्यात किती ही मोठे संकट आले तरी या वारी काळात काहींनी घरी बसून विठुरायाच्या नामस्मरण,भगवतगीता, ज्ञानेश्वरी ,तुकाराम गाथा अनेक धार्मिक पुस्तकांचे वाचन पारायण करीत विठ्ठल व विठ्ठलाचे रूप,विठ्ठल भक्ती ध्यानी मनी करून तीची साठवणूक करत होता.
वैष्णवजनांची मनातून एक इच्छा होती कोरोनरुपी हा महाभयंकर रोग नाहीसा व्हावा व परत पहिल्या सारखे मानवी जीवन सुरळीत होऊन लाखो वैष्णवजनांन सहित
नेत्रदीपक असा पायीवारी सोहळा
व्हावा.
कोरोनाचे सद्यस्थितीत पूर्ण पणे
अटी नियम र्निबंध उठल्यामुळे
यंदा चा आषाढी वारी सोहळा हा वैष्णवजनांना पायी करता येणार असल्याने राज्यभरात असलेल्या लाखो भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
पायी वारीला जाण्यासाठी पूर्वतयारी ची लगबग करताना ते दिसत आहेत.
वारीत वर्षभरासाठी भक्ती,वैराग्य, ज्ञान व प्रेम याची देवाण घेवाण होत असते.लहान थोर,जात, पात,भेदभाव,उच्च निच्च,व्यक्ते श्रोते,गरीब श्रीमंत यांचा भेद न मानणारी, सर्वांना समान वागणूक देणारी, माणूसकीचा धर्म शिकवण देणारी म्हणजे ही वारी होय.
वारीत पायी चालत असताना खांद्यावरी भगव्या पताका घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष वैष्णवजनांचा सुरू असतो.
ऊन वारा पाऊस चिखल याची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भक्तीने, विठ्ठलाच्या भेटीसाठी ,दर्शनासाठी
असणारी आस वारी काळात लागलेली असते.
हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।१।।
पंढरीचा वारकरी ।वारी चुको नेदी हरी।।२।।
संत संग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ।।३।।
चंद्रभागे स्नान। तुका मागे हेचि दान .।।४।।।”
या दोन वर्षात पालखी मार्गावरील
खूप बदल झालेला वारकऱ्यांना या निमित्ताने दिसेल,रस्ता रुंदीकरणामुळे
वारकऱ्यांची काही मुक्काम ठिकाणे,दुपारचा विसावा,रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खुणा नामशेष झालेल्या ही दिसतील.
Discussion about this post