Pimpri News : पिंपरी : नगर कल्याण मार्गावर जुन्नर तालुक्यात डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी चौघे एकाच कुटुंबातील आहेत.
गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५), हर्षद मस्करे (वय ४) आणि काव्या मस्करे (वय ६, सर्व रा. मढ) अशी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.नरेश नामदेव दिवटे (वय ६६, रा. पेडे परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि हमाल अमोल मुकुंदा ठोखे (रा. जालना) यांचाही या अपघातात जागीच मृत्यु झाला. दोघा प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही.
रिक्षाचालक नरेश नामदेव दिवटे (वय ६६, रा. पेढे परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि हमाल अमोल मुकुंदा ठोखे (रा. जालना) यांचाही या अपघातात जागीच मृत्यु झाला. भाजीपाला व्यवसाय करणारे मस्करे हे पत्नी व दोन लहान मुलांना घेऊन पीकअप घेऊन जात होते. पिकअप ओतूरकडून कल्याणकडे जात असताना त्याने समोरुन आलेल्या रिक्षाला धडक दिली. ही रिक्षा नरेश दिवटे चालवत होते. या धडकेनंतर पिकअप तसाच पुढे गेला व रिक्षाच्या मागून आलेल्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात पिकअपमधील पाच जण आणि रिक्षामधील रिक्षाचालक व दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यावर ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आठही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ओतूर रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
Discussion about this post