(व्हीएसआरएस न्यूज) | भारतीय गोलंदाजांशिवाय ओवरसीज खेळाडूंनीही छाप टाकली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत फलंदाजांसोबतच गोलंदाजांचाही मैदानात बोलबाला दिसून आला आहे. अनेक खेळाडू असे आहेत, जे आयपीएल खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चमकले आहेत. जसप्रीत बुमराहा आणि पांड्या ब्रदर्सशिवाय अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. विकेट हॅट्रिक घेणं कोणत्याही गोलंदाजासाठी मोठं यश असतं आणि आयपीएलमध्ये असं अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. आयपीएलमध्ये २००८ पासून २०१४ पर्यंत झालेल्या प्रत्येक सीजनमध्ये कोणत्या ना कोणत्या गोलंदाजाच्या पारड्यात विकेट हॅट्रिक पडली आहे.
त्यानंतर २०१५ मध्ये विकेट हॅट्रिक घेण्यात गोलंदाजांना अपयश आलं होतं आणि २०१६ मध्ये पुन्हा विकेट हॅट्रिकवर नाव कोरलं गेलं. त्यानंतर २०१८ आणि २०२० मध्ये कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेऊ शकला नाही. अमित मिश्रा आणि युवरजा सिंग असे खेळाडू आहेत, ज्यांनी २ किंवा त्याहून अधिक वेळा विकेट हॅट्रिक घेऊन इतिहास रचला आहे. मिश्राने ३ आणि युवराजने २ वेळा विकेट हॅट्रिक घेतली आहे.
Discussion about this post