व्हीएसआरएस न्युज मुंबई –: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.
त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलतील याची उत्सुकता सर्वांना आहे. मुख्यमंत्री आजच्या संवादात काय बोलणार? राज्यात निर्बंध शिथिल होणार का? झाला तर कुठे कुठे होईल? याविषयी उत्सुकता लागली आहे.
राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली पाहिजे अशी मागणी सातत्याने समोर येत आहे राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवार पैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल. आता या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आज जाहीर करतात का याची उत्सुकता आहे.
Discussion about this post