व्हीएसआरएस मराठी न्युज -गेल्याकाही वर्षांपासून राज्यातील बोगस शाळांचा मुंबईसह राज्यामध्ये सुळसुळाट झालेला यला मिळत आहे. या विरोधात अनेकदा तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत. या बोगस शाळांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य देखील धोक्यात आल्याचे यला मिळत आहे.
पण आता राज्यातील या बोगस शाळांविरोधात कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांकडून देण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना येत्या 30 एप्रिलपर्यंतचा शाळा बंद करण्याचा अल्टिमेटम देत हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि राज्यातील इतर भागांमधील बोगस शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यातील बोगस शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील बोगस शाळांविरोधात करावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्तांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
बोगस शाळा कशी ओळखणार
– पालकांनी मुलांचे अॅडमिशन करताना शाळेकडे संबंधित बोर्ड आणि शासन मान्यतेची चौकशी करावी.
– तसेच संबंधित शाळेकडे शासनाने दिलेला मान्यता आदेश क्रमांक तपासून घ्यावा.
– शाळांनी सर्व माहिती शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात लावली आहे का? हे पालकांनी तपासून घ्यावे.
– मुलांचे अॅडमिशन करताना संबंधित शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयात शाळेची चौकशी करून घ्यावी.
Discussion about this post