व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -राज्यात होणाऱ्या सत्तेच्या उलथापालथ पाहता भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना आणि सोबत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांना बुधवारी 29 जून सकाळपर्यंत मुंबई उपस्थित रहाण्याच्या सूचना कोअर कमिटीच्या बैठकीतून दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या निलंबन बाबतचा कोणतीही कारवाई 12 जुलैपर्यंत करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणावर देखील चर्चा झाली आहे. राज्यात होणाऱ्या सत्तेच्या उलथापालथ पाहता भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना आणि सोबत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांना बुधवारी 29 जून सकाळपर्यंत मुंबई उपस्थित रहाण्याच्या सूचना कोअर कमिटीच्या बैठकीतून दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सत्तास्थापनेच्या आलेल्या संधीत विलंब होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे.
Discussion about this post