व्हीएसआरएस मराठी न्युज –अकोला जिल्ह्यात रविवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मंदिराच्या टिन शेडवर कडुलिंबाचे मोठे झाड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले.
रविवारी सायंकाळी उशिरा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावातील बाबूजी महाराज मंदिर संस्थान येथे जुने कडुलिंबाचे झाड उन्मळून टिनाच्या शेडवर पडले. त्यावेळी पावसामुळे अनेकांनी शेडखाली आसरा घेतला होता. माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
Discussion about this post