New Delhi : नवी दिल्ली : पंजाबमध्ये पठाणकोट ते उचीबस्सी हे ७० किलोमीटरचे अंतर चालकाविना एक मालगाडी धावली. यामुळे एकच खळबळ उडाली. अखेरीस उचीबस्सी येथे रुळांवर लाकडाचे ठोकळे ठेवून ही मालगाडी थांबविण्यात रेल्वे कर्मचार्यांना यश आले.सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी रेल्वे अधिकार्यांनी माध्यमांना सांगितले की, ही गौण खनिज वाहून नेणारी मालगाडी पठाणकोट स्थानकावर थांबली होती. तिचा चालक केबिनमधून उतरताना हँडब्रेक लावण्यास विसरला. स्थानकाजवळ उतार असल्यामुळे चालक उतरल्यानंतर पुढे चालू लागली. रेल्वे निघून गेल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्यामध्ये एकच खळबळ माजली. शेवटी रुळांवर लाकडी ठोकळे टाकून ती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. उचीबस्सी हे स्थानक पठाणकोट पासून ७० किलोमीटरवर आहे. तेथे रुळांवर ठोकळे ठेवून मालगाडी थांबविण्यात रेल्वेच्या कर्मचार्यांना यश आले.
या प्रकरणाची रेल्वे अधिकारी चौकशी करत आहेत.
Discussion about this post