व्हीएसआरएस मराठी न्युज –२६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी १८९ कैद्यांच्या शिक्षेला विशेष माफी देऊन, त्यांना कारागृहातून सुटका करून त्यांना स्वातंत्र्य करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्त यंदाचं वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या, परंतु चांगली वर्तणूक आणि इतर निकषांनुसार पात्र कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यालयामार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार मागील १५ ऑगस्ट रोजी राज्यातील २०४ कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती.
Discussion about this post