व्हीएसआरएस मराठी न्युज – पुरात्तवविभागाने मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया बाबत खबळजनक खुलासा केला आहे. गेटवे ऑफ इंडियाची इमारत कालांतराने कमकुवत होत असल्याचे पुरातव विभागाने म्हंटले आहे.
या ऐतिहासिक वास्तूला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. चिंतेची बाब म्हणजे समुद्राभिमुख असलेल्या या इमारतीचा पाया आणि भिंतींना तडे जात आहेत. इमारतीच्या दुरुस्तीची नितांत गरज आहे. ही इमारत समुद्राचे वादळ सहन करण्यास सक्षम नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य पुरातत्व विभागाने गेट वे ऑफ इंडियाची दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
गेटवे ऑफ इंडियाच्या Gateway of India सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असल्याची ग्वाही दिली. हा प्रस्ताव मंजूर होताच लवकरच इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास: इंडो-सारासेनिक शैलीत बांधलेला गेटवे ऑफ इंडिया 20 व्या शतकात मुंबईत समुद्रकिनारी बांधला गेला. गेटवे ऑफ इंडियाची ही इमारत सन १९२४ मध्ये पूर्ण झाली. राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीदरम्यान ही इमारत बांधण्यात आली होती असे मानले जाते. या इमारतीला मुंबईचा ताजमहाल असेही म्हणतात. इंग्रजांची शेवटची तुकडीही गेटवे ऑफ इंडियातूनच भारतातून निघाली होती.
Discussion about this post