व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर आता आजपासुन मंत्रालयाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे आता मंत्रालयात वर्दळ वाढणार आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात 16 मार्च 2020 पासून प्रवेश बंद करण्यात आला होता.
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण मंत्रालयात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे शासकीय कामांसाठी येणाऱयांची अडचण निर्माण झाली होती. सर्वसामान्यांना पुन्हा मंत्रालयात प्रवेश देण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर आता 18 मेपासून हा प्रवेश देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
Discussion about this post