व्हीएसआरएस न्युज मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज ४,५०५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ हजार ५६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१ लाख ५१ हजार ९५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के आहे.
राज्यात आज ६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०१ टक्के झाला आहे. तब्बल ४४ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ६८ हजार ३७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नंदूरबार (८), धुळे (0) , हिंगोली (८३), नांदेड (४८), अमरावती (८९), वाशिम (८४), भंडारा (१), गोंदिया (८६), गडचिरोली (२१) या नऊ जिल्ह्यात अँक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १४, १४९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
धुळ्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये सर्वाधिक ५७५ रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ९७,२५, ६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,५७, ८३३ (१२.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२१,६८३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Discussion about this post