व्हीएसआरएस मराठी न्युज –राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काम बंद करीत आकुर्डी शहर क्क्षयरोग केंद्र आकुर्डीत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानअंतर्गत ग्रामीण रुग्णालयापासून ते आरोग्य उपकेंद्रापर्यंतच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे शासकीय सेवेत समायोजन करुन घेण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत एनटीईपी कंपाटी अधिकारी व कर्मचा-यांना रिक्त पदावर समायोजन अरण्याबाबत राज्य स्तरावर दि. २५ ऑक्टोंबर २०२३ पासून बेमुदत आंदोलन करण्याचे निमित करण्यात आले आहे. त्यामुळे गेली १५ ते २० वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत जोपर्यंत शासन किंवा महानगरपालिका काही निर्णय घेऊन लेखी देत नाही. तोपर्यंत नाईलाजास्तव दि. ३ नोव्हेंबर २०२३ पासून बेमुदत राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत असून ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये / महानगरपालिकेमध्ये एनएचएम कर्मचा-यांचे समायोजन केले आहे त्या धर्तीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमात असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन शासन महानगरपालिकेच्या स्तरावर त्वरित करण्यात यावे. तसेच जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहील व होणा-या नुकसानीस शासन जबाबदार राहील.
सदर कामबंद आयोजनात श्री. चंद्रशेखर सरवदे, श्री. सुरज कावळे व श्रीम. वैशाली बासकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली आहे.
Discussion about this post