व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी (ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)पिंपरी चिंचवड हद्दीतून तसेच नदी काठच्या गावातून प्रक्रिया न केलेले रासायनिकयुक्त सांडपाणी तसेच इंद्रायणीच्या नदीपात्रात सोडले जाते.
याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सध्या दशक्रियाघाटा जवळील नदीपात्रात काळसर रंगाचे पाणी झालेले दिसून येत आहे. तसेच
गरुड स्तंभा जवळ जलपर्णी सध्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र नदीपात्रात दिसत आहे.सिद्धबेटातील व गोपाळपुरा बंधाऱ्यात पूर्णपणे मोठया प्रमाणात जलपर्णी दिसत आहे.आळंदी दशक्रिया विधी घाटावर गावातील व बाहेरील गावातील अनेक नागरिक
दशक्रिया विधी साठी येत असतात.आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रा पैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
इंद्रायणी नदी घाटावर दशक्रिया विधी असो वा नसो पण येथे येणारे भाविक हे ,ही पवित्र नदी म्हणून या नदीत स्नान करत असतात.सध्या नदी पात्रातील पाणी फारच दूषित झाल्याचे दिसून येत आहे. नदीत स्नान करणाऱ्यांना त्वचेचे विविध विकार ही होऊ शकतात.सद्यस्थितीत गावातील बहुतेक नागरिक दशक्रिया घाटावरती दशक्रिया विधी च्या
वेळेस पाण्याचे टँकर मागवताना दिसतात.दशक्रिया विधी च्या वेळी नदी जवळ असूनही नदीपात्रात स्नान करता येत नाही. अशी दुर्दैशा ग्रामस्थ नागरिकांची झालेली दिसते.दशक्रिया घाटावरती दशक्रिया विधी करण्या अगोदर स्नानासाठी नदीपात्रात
जाताना ते प्रदूषित पाणी पाहून स्वच्छ पाणी स्नाना करीता हवे अशी भावना नागरिकांची येथे प्रकट होते. घाटावरती नगरपरिषदेचे स्वच्छ सर्वेक्षणाचे फलक आहेत.
त्यावरती लिहण्यात आले आहे,नदी घाटावरती कपडे धुण्यास सक्त मनाई आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ५०००/- रुपये दंड वसूल करण्यात येईल. परंतु दररोज सरास पणे नदीपात्रात कपडे धुणे चालू असल्याचे दिसत आहे.
Discussion about this post