व्हीएसआरएस न्युज आजच्याच दिवशी, 7 ऑगस्ट 1941 रोजी कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली.
रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी बंगालमधील जोजासांको या ठिकाणी झाला. रविंद्रनाथ टागोरांनी भारताच्या आणि बांग्लादेशच्या राष्ट्रगीताची निर्मिती केली. त्यांनी कला, साहित्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं.
भारत आणि बांग्लादेश या दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे रविंद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव कवी आहेत.
रविंद्रनाथांनी वयाच्या आठव्या वर्षी आपले पहिले काव्य लिहिलं होतं तर 16 व्या वर्षी त्यांची पहिली लघुकथा प्रकाशित झाली होती.
रविंद्रनाथ टागोर यांनी साहित्यामध्ये दोन हजारांहून अधिक रचना केल्या आहेत. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात आपलं योगदान दिलं.
‘गीतांजली’ या काव्यरचनेसाठी 1913 साली त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. साहित्याचा नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले व्यक्ती होते.
रविंद्रनाथ टागोर यांनी आपल्या कार्यकालात अनेक देशांचा दौरा केला. त्यांनी आयुष्यभर पूर्व आणि पश्चिम जगतामधील दुवा म्हणून काम केलं. भारताच्या . अशा या महान सुपुत्राला पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन.
Discussion about this post