व्हीएसआरएस न्युजपिंपरी दि. २१,
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस चे नवनियुक्त अध्यक्ष डॅा.कैलास कदम यांच्या अध्यक्षतेखालील पहिली च बैठक पिंपरी चौकातील एका हॅाटेलात पार पडली. या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या प्रभारी मा. सोनल पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीच्या सुरूवातीस जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पटेल व कदम यांच्या हस्ते पुजन करून बैठकीची सुरूवात करण्यात आली.
प्रस्तावना करताना शहराध्यक्ष कदम म्हणाले, “आगामी काळात जनतेसमोर येणारी सर्व आव्हाने पेलण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होऊन कामाला लागले पाहीजे आपआपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या वर आंदोलने करत व पक्ष संघटनेचे जाळे शहरभर पसरवून आपणांस पक्षास गतवैभव प्राप्त करुन द्यायचे आहे, महानगरपालिकेतील सत्ताधा-यांनी भ्रष्टाचाराच्या परिसिमा गाठल्या आहेत व स्थायी समिती लाचलुचपत विभागाने रंगेहात सभापतींनी रंगेहात पकडून ही भाजपाने पुन्हा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवत भ्रष्टाचाराचे खुले समर्थनच केले आहे व यामुळे शहर भाजपा चा व त्यांच्या लूटीच्या कार्यपध्दतीचा खरा चेहरा जनते समोर आला आहे, माझा भाजपाला सवाल आहे की यावर भाजपा नेते गप्प का? ते तरी गप्प असले तरी आता सर्व जाणणारी जनता आता गप्प बसणार नाही व त्यांना आगामी निवडणूकीत जागा दाखवून देईल पण आपण देखील सर्वानी जनते पर्यंत पोहचून ही परिस्थीती बदलण्याचे आवाहन केले पाहीजे”
बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली या दरम्यान कार्यकर्त्यानी आपल्या भावना व्यक्त करत जोमाने काम करण्याचा मनोदय व्यक्त केला व नविन अध्यक्षांच्या निवडीबाबत आनंद व पक्ष नेतृत्वा प्रति आभार व्यक्त केले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त सचिव गौतम आरकडे यांचा सोनल पटेल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, माजी महापौर कविचंद भाट, श्यामला सोनवणे व गौतम आरकडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्यातून सुंदर कांबळे, स्वप्निल बनसोडे, रवी नांगरे, उमेश बनसोडे, सज्जी वर्की, विश्वास गजरमल, विरेंद्र गायकवाड, दिनकर भालेकर, सज्जी वर्की, सतिश भोसले, एकनाथ मुंडे आदिनी मनोगते व्यक्त केली.
अखिल भारतीय काँग्रेस च्या सचिव सोनल पटेल म्हणाल्या, “देशातील जनता त्रस्त झाली आहे, लोकांना पश्चाताप होतो आहे. भाजपाने जनतेची लूट करत फूट पाडण्याचे उद्योग आधीपासूनच सुरूच ठेवले आहेत पण आता जनतेला सर्व लक्षात आले आहे व काही ठिकाणी देशात मोदींचा पुतळा रावणाप्रमाणे जाळण्यात आला आहे. आपण आता चांगली निवडणूक तंत्रे वापरत सेक्टर प्रमुख, बूथ प्रमुख वार्ड मोहल्ला कमिटी करत स्क्षूम बांधणी करत वाटचाल ठेवली पाहीजे. कार्यकर्त्यांची स्तर रचना योग्य केली तर विजय
दूर नाही हे जाणून कामाला लागा, लोकांत जा, आवाहन करा व सहाभागी करून घेऊन लढा उभारा”, असे पटेल म्हणाल्या.
या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस सचिव व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल, काँग्रेस चे शहराध्यक्ष डॅा.कैलास कदम, प्रदेश काँग्रेस चे सचिव गौतम आरकडे, सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, माजी महापौर कविचंद भाट, पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, माजी महीला प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, वाल्मिकी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मोहन बिडलान, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, असंघटित कामगार काँग्रेस चे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, सदगुरू कदम, माजी सभापती शिक्षण मंडळ अभिमन्यू दहितूले, ज्येष्ठ नागरिक चे शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, के एम रॅाय, तिरूमल, इस्माईल संगम, माऊली मलशेट्टी, शोभा पगारे, विजय ओव्हाळ, रवी नांगरे, सज्जी वर्की, दिनकर भालेकर,जनार्दन पोलकडे, तानाजी काटे, सुनिल राऊत, गुंगा शिरसागर, उमेश बनसोडे, नितीन कांबळे, रोहीत तिकोणे, अन्वर ईनामदार आदि उपस्थित होते.
सुत्र संचलन नरेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष हरीनारायण यांनी केले.
Discussion about this post