व्हीएसआरएस मराठी न्युज –दि.५गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता आळंदी पोलीस स्टेशन मध्ये सर्व धर्मीय सामाजिक सलोखा स्नेह मेळावा हा कार्यक्रम आळंदी पोलीस स्टेशनने आयोजित केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यावेळेस म्हणाले सर्व धर्मीय सामाजिक सलोखा स्नेह मेळाव्याचे आयोजन हे सामाजिक सलोखा एकोपा वाढवा यासाठी तसेच आळंदीत विविध जयंती, उत्सव ,सण शांतपणे साजरे करण्यात आले व या कार्यक्रमा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार न झाल्याने त्यांचा आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या निमित्ताने आयोजकांच्या वतीने आनंदराव मुंगसे,विशाल थोरात,बनसोडे
ॲड.नाझीम शेख, अजित वडगांवर यांनी या सर्वधर्म समभाव या विषयांवर आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रामुख्याने ॲड.नाझीम शेख यांनी सर्वधर्म समभाव याविषयी मार्गदर्शन करत काहींकडून राजकारणात तरुण पिढी चा दुरुपयोग,वापर कश्या पद्धतीने होतो हे सांगत,संतचरित्र वाचन,हिंदू मुस्लिम देवांच्या मध्ये असलेल्या नामस्मरणात असलेली समानता सांगितली.
ग्रामस्थां तर्फे प्रशांत कुऱ्हाडे
यावेळेस म्हणाले गीता ,बायबल, कुराण हे तीन श्रेष्ठ ग्रंथ असून चौथा ग्रंथ म्हणजे आपल्या साठी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार केलेले हे आहे. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत सांगून आपले जीवन सुलभ केले आहे.
डी. डी. भोसले पा. या वेळेस म्हणाले माऊलींच्या मंदिरावर व गावातील मशिदीवर पहिल्या
पासून स्पीकर,भोंगे नाही.आळंदीमध्ये काही वर्षांपूर्वी मशीद बांधण्यात आली आहे,परंतु त्यावर देखील भोंगा लावलेला नाही.मंदिरात प्रवचन ,कीर्तन अनेक सोहळे असतात.परंतु त्यासाठी मंदिरात कोणतेही लाऊडस्पीकर नाही.मंदिराच्या गाभाऱ्यात व आणि आवारामध्ये छोटे स्पीकरवर
कार्यक्रम आयोजन केले जाते.त्या आवाजाचा त्रास बाहेरच्या घटकांना होत नाही. अश्या पध्दतीने ही गावात सामाजिक सलोखा दिसून येत आहे.
काल नाजीम व आरिफ शेख यांच्या मातोश्री यांचे निधन होऊन सुद्धा या कार्यक्रमाचे महत्त्व जाणत ते येथे उपस्थित आहे हे प्रामुख्याने सांगितले.
प्रकाश कुऱ्हाडे यावेळेस म्हणाले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व कल्याणासाठी पसायदान सांगितले तसेच त्यांचे या भूमीत आचार विचार प्रामुख्याने असल्याने जाती भेदाला गावात थारा नाही.पोलीस स्टेशनमध्ये प्रथम च असा सर्व धर्मीय सामाजिक सलोखा राहावा यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त अभयजी टिळक यावेळी सांगितले माणसात समानता ,बंधुता,प्रेम,असणारे .
भेदभाव नसणारे संत तुकाराम यांचे अभंग व संत ज्ञानेश्वर यांची ओवी सांगत त्याचे पूर्ण स्पष्टीकरण देत विविध जाती धर्माचे संतांचे महापुरुषांचे दाखले दिले.स्वराज्य निर्माण व्हावे ही तर श्रींची ईच्छा,त्यात सर्व धर्मांचा समावेश करत स्वराज्य निर्माण करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज.
लोकांनी ज्यांच्या अंगावर शेण दगडी फेकून मारली त्यांनीच समाजकार्य करत परिवर्तन घडवले असे महात्मा फुले.अन्याया विरुद्ध आवाज उठवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयी माहिती देत हिंदू,जैन,बौद्ध, मुस्लिम,लिंगायत या जाती धर्मांच्या समानतेच्या
आचारांची ,विचारांची ,समान तत्वांची माहिती दिली.
शिवजयंती, रामनवमी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,महात्मा फुले जयंती,महावीर जयंती,महात्मा बसवेश्वर जयंती,रमजान ईद इ. आयोजकांचे येथे सत्कार करण्यात आले.सर्व पत्रकारांचा सत्कार ही करण्यात आला. तसेच या स्नेहमेळाव्यात विविध पक्ष व संघटनेचे अनेक मान्यवर उपस्थित होते.शिवस्मृती व शिवतेज मंडळ,सिद्धार्थ ग्रुप,आळंदी दक्षता समिती,दक्षता सेवा फाउंडेशन गावातील विविध संघटना ,तरुण मंडळाने देखील आळंदी पोलीस स्टेशन ने केलेल्या मदत सहकार्या बद्दल त्यांचा सत्कार केला.
Discussion about this post