Ayodhya News : अयोध्या : ‘श्रीरामजन्मभूमीसाठी ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर रामजन्मभूमी मुक्त झाली आणि आज साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य राम मंदिराची निर्मिती होऊन रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळा आम्ही आज पहात आहोत, हा सनातन हिंदु धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशभरातील सर्व संत-महंतांना मान देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रामलला पुन्हा राम मंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदी आहे’, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या बिंदा सिंगबाळ यांनी या वेळी केले.
ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी बिंदा सिंगबाळ आणि अंजली गाडगीळ यांची उपस्थिती होती. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी सनातन संस्थेच्या दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकारी यांना आमंत्रित केले होते.
‘आसेतुहिमालयापासून हिंदसागरापर्यंत प्रत्येकाला एकात्मतेच्या बंधनात बांधणारे श्रीराम हे एक अलौकिक राष्ट्रसूत्र आहे! प्रत्येकाच्या मनातील श्रीरामाच्या मंदिराची उभारणी हे न केवळ अधर्मावर धर्माचा विजय; परंतु त्याचसमवेत कलियुगांतर्गत सत्ययुगाच्या नवनिर्मितीची, हिंदूंच्या अलौकिक ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’ची, म्हणजेच स्वधर्माधिष्ठित स्वराष्ट्र, सर्वशक्तीसंपन्न, सुव्यवस्थाप्रधान, सर्वसुविधांयुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत सुराज्याच्या सूर्योदयाची नांदी आहेत, असे प्रतिपादन अंजली गाडगीळ यांनी या प्रसंगी केले.
या वेळी दोन्ही उत्तराधिकारींंचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाल्यावर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी तथा उत्तर प्रदेश शासनाच्या राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
Discussion about this post