व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे- पुण्यात विकास कामाच्या उदघाटन समारंभात भाषण करत असताना अजान सुरू झाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपले भाषण थांबवले अजान संपल्यावर त्यांनी पुन्हा भाषणासाठी सुरवात केली..
संस्कारी आणि सर्वधर्मसमभाव जपणारं दादांचे नेतृत्व या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसावर-धर्मावर, प्रेम,
आपुलकी,आदर दर्शवतो ..!!!
राजकारणामध्ये आकस ठेवला नाही पाहिजे. आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्रणाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करुन कोणाचेही राजकीय जीवन संपवता कामा नये. राज्यामध्ये आज दोन्ही बाजूंचे चुकत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावर नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
पवार म्हणाले, आजकाल कोण काय म्हणतो, आपण ज्याच्याबद्दल बोलतो त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली योग्यता तरी आहे का हेही पाहिले जाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही बाजूच्या चूका आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. लोकांना हे राजकारण आवडत नाही. लोक विकासाबाबत आपल्याला कोण मदत करेल हे पाहतात. विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. मनुष्य विकास, शिक्षण क्षेत्र, ईनोव्हेशन, रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे लागले, असेही पवार यांनी सांगितले.
Discussion about this post