व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणावर आज धरणग्रस्तांनी तीव्र मोर्चा काढला. या मोर्चात मावळचे आमदार सुनील शेळके आणि धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले. पवनानगर बाजारपेठेतून घोषणाबाजी करत मोर्चा पवना धरणावर पोहोचला.
पवना धरणावर मोर्चा जाताच पोलिसांनी मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न केला. “आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांना अडवू नका, आम्हाला गोळ्या घाला असे आमदार सुनील शेळके यांनी म्हणत पोलिसांचा विरोध झुगारून पवना धरण परिसरात मोर्चेकऱ्यांना पुढे घेऊन गेले. गेल्या अनेक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. चार एकर जमीन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी मिळावी, अशा मागण्या घेऊन धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे.
पवना धरणावर जाऊन आमदार सुनील शेळके यांच्यासह (Farmer) शेतकऱ्यांनी येथील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. यानंतर पिंपरी चिंचवडला जाणारे पाणी बंद करून टाळे ठोकले आहे. यावेळी पोलिस प्रशासन देखील काही करू शकले नाही.
Discussion about this post