व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –नागरिकांना एक ते दोन किलोमीटर अंतरावर जायचे असल्यास पायी चालण्याचा पर्याय निवडावा. 2 ते 4 किलोमीटरच्या अंतरात जायचे असल्यास सायकलचा वापर करावा. शहरात झालेल्या रिव्हर सायक्लोथॉनला 20 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. लोकांमध्ये सायकल वापरण्याबाबत उत्साह आहे. तो दैनंदिन आयुष्यातही दिसायला हवा. 4 किलोमीटर पुढील प्रवासासाठी बस, अॅटो रिक्षा, मेट्रो, खासगी बसेस असे पर्याय वापरता येतील. खासगी वाहनांचा वापर कमी व्हायला हवा, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
शहरातील पदपथांवर सर्रास पार्किंग होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काही ठिकाणी पदपथांवर दुचाकी व चारचाकी वाहने लागलेली असतात. त्याशिवाय, पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. टपर्या, पथारी टाकून पदपथ बळकावण्यात आले आहेत.
त्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन त्याबाबत फेसबुक लाइव्हमध्ये भूमिका स्पष्ट करताना शेखर सिंह म्हणाले, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. तशीच नागरिकांनीदेखील त्यांची जबाबदारी पाळणे गरजेचे आहे. पदपथ हे पार्किंगसाठी नाहीत. त्यांचा वापर पादचार्यांना चालण्यासाठीच व्हायला हवा. पदपथावर होणार्या पार्किंगसंदर्भात पोलिस प्रशासनाच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
Discussion about this post