व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -आकुर्डी जलतरण तलावाची प्रवेश क्षमता ६० आहे. तरी या ठिकाणी १३० जणांना पोहण्यासाठी सोडण्यात आले होते. गोपनीय चौकशी करावी. तलाव अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी केली आहे.
आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज तरण तलावात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या अभियांत्रिकीच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या बाबत तरुणाच्या वडिलांनी निगडी पोलिसांना निवेदन दिले आहे. ‘माझ्या मुलाला आणि कुटुंबीयांना न्याय द्या,’ अशी मागणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी
पोलिसांकडे केली आहे.
कृष्णा क्षीरसागर (वय १९, रा. बॉईज हॉस्टेल, निगडी. मूळ रा. नांदेड) असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजी माणिकराव क्षीरसागर यांनी निगडी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. कृष्णा आकुर्डी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. आठ मे रोजी सकाळी मित्रांसोबत आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी गेला. पोहत असताना बराच वेळ झाला तरी कृष्णा पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला आणि तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कृष्णाचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचे त्याच्या वडिलांचे मत आहे. माझा मुलगा पिंपरी-चिंचवडमध्ये शिकत होता. आठ मे रोजी सकाळी त्याचा आकुर्डीतील जलतरण तलावात संशयास्पद मृत्यू झाला.
माझा मुलगा पिंपरी-चिंचवडमध्ये शिकत होता. आठ मे रोजी सकाळी त्याचा आकुर्डीतील तरण तलावात संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी याचा तपास करून माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. तरण तलाव, होस्टेल, कॉलेज स्टाफ व मुलांकडे चौकशी करावी, असे शिवाजी क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.
तलाव अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी केली आहे, नाही तर आंदोलन करण्यात येईल अस पत्रात सांगितले .
Discussion about this post