New Delhi : नवी दिल्ली : केंद्रसरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविली असून याची अधिसूचना लवकरच काढण्यात येईल अशी माहिती . केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्यांना दिलासा मिळेल. मात्र, देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव नजिकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
गेले अनेक दिवस कांद्याच्या निर्यातीला सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी शेतकर्यांकडून होत होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे; अशी टीका विरोधकांकडून सुरू झाली आहे.
Discussion about this post