व्हीएसआरएस मराठी न्युज आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्बन्धांमुळे आषाढी पालखी सोहळ्यावर बंधने आली होती.कोरोनारूपी सावट असल्याने मोजक्याच लोकांमध्ये लालपरीत (एस. टी .बसने)सोहळा पार पडला.
परंतु सद्यस्थितीत कोरोनाचे नियम,निर्बन्ध शिथिल केले गेले आहेत. यामुळे पालखी सोहळा मोठ्या संख्येने उत्साहात भरण्याची शक्यता आहे.आज दि.२४/०४/२०२२ रोजी रविवार सकाळी १०:३० वाजता मंदिराच्या सभागृहात बैल जोडी समितीची सभा आयोजित केली होती.या बैठकीत ह्यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२२ रथासाठी आळंदीकर ग्रामस्थांच्या रोटेशन पध्दतीने श्री पांडुरंग तुकाराम वरखडे घराण्याचा मान असल्याने सभेपुढे अर्ज ही आला होता. समितीने सर्वांनुमते विचार करून,योग्य तो निर्णय घेऊन श्री पांडुरंग तुकाराम वरखडे यांचा बैल जोडी लावणेचा मान दिला आहे. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान चे विश्वस्त अभयजी टिळक यांच्या हस्ते श्री पांडुरंग वरखडे यांचा सत्कार करण्यात आला. बैल जोडी निवड समिती अध्यक्ष बबनराव पर्वतराव कुऱ्हाडे पा. शिवाजीराव रामचंद्र रानवडे पा.,नंदकुमार पंढरीनाथ कुऱ्हाडे पा.विलासराव बाळासाहेब घुंडरे पा. रामचंद्र दत्तात्रय भोसले पा.ज्ञानोबा नाथू वहिले पा. रमेश दत्तात्रय कुऱ्हाडे पा. हे सर्व बैल जोडी निवड समिती सदस्य येथे उपस्थित होते.पालखी सोहळा रथासाठी श्री पांडुरंग वरखडे यांची बैल जोडी ची निवड झालेली कळताच
आळंदीकर नागरिकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन ही केले आहे.
यंदा पालखी सोहळा परंपरेने पायी वारीने साजरा होत असल्याने बहुसंख्य वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायात ही अतिशय आनंदाचे वातावरण
दिसून येत आहे.
Discussion about this post