व्हीएसआरएस मराठी न्युज -विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचा कार्यक्रम पार पडला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मंत्री, आमदारांनी उपस्थित राहायला हवे. पक्षाच्या सर्व सदस्यांचा सक्रीय सहभाग विधिमंडळाच्या कामकाजात असावा, असे निर्देश पवार साहेबांनी बैठकीत दिले, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. जेव्हा द्वेषबुद्धीचे राजकारण सुरु होते, तेव्हा त्याची फळे कालांतराने भोगावी लागतात, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.
Discussion about this post