व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणे (Pune) जिल्ह्यातही परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. काल दुपारनंतर पुण्यात झालेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारंबळ उडवली. दीड ते दोन तास सरु असलेल्या पावसानं सगळीकडं पाणीच पाणी केलं आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं.
मुसळधार पावसामुळं पुण्यात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दीड ते दोन तासाच्या पावसानं सगळीकडे दाणादाण उडाली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरीकांची मात्र चांगलीच धावपळ झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. या परतीच्या पावसामुळं पुणेकर मात्र हैराण झाले आहेत.
गेल्या तीन ते चार दिवसात परतीच्या पावसानं पुण्यासह महाराष्ट्राला झोडपलं आहे. या पावसामुळं औरंगाबाद, नाशिक, परभणी, जालना, बीडमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर पुण्यात काल चार ते पाच दरम्यान झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचलं होतं. अशातच आता पुणे जिल्ह्याला दोन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Discussion about this post