व्हीएसआरएस न्युज मुंबई -20 जुलैला यावर्षी मंगळवारी देवशयनी एकादशी आहे. महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये आषाढी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी लाखो भाविक पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.
या कोरोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आषाढी एकादशी अतिशय साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्मासाला सुरुवात होते.
दर एकादशीला भक्त उपवास करतात मात्र, आषाढी एकादशीचं महत्त्व एकादशीमध्ये सगळ्यात जास्त आहे. एकादशीचा उपवास किंवा व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रदोषच्या दिवशी पूर्ण होतो.
आषाढी एकादशी प्रेदोष काळ
आषाढ़ी एकादशी मुहूर्त : 21 जुलै, पहाटे 05:35:57 पासून रात्री 08:20:29 पर्यंत
एकादशीचं व्रत
आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत केल्यामुळे व्यक्तीला उत्तम फळ मिळतं. याशिवाय हाती घेतलेल्या कामांमध्ये यश प्राप्त होते. उपवास करणार्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. शिवाय एकादशीला पापनाशक मानलं जातं. या दिवशी सूर्यदेव मिथुन राशीमध्ये प्रवेश करतात आणि त्याच दिवशी रात्री विष्णू योग निद्रेमध्ये जातात असं धर्मशास्त्र सांगतं. आणि या काळापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासाच्या काळात चारही महिने सूर्यदेव तुळ राशीमध्ये विराजमान असणार आहेत.
आषाढी एकादशीचं धार्मिक महत्व
देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशीला पौराणिक महत्त्व आहे. कारण या तिथीला विष्णू देव पाताळात निद्रा घेतात. त्यामुळेच या 4 महिन्यांमध्ये कोणतंही धार्मिक कार्य केलं जात नाही. कारण या काळामध्ये केलेल्या कोणत्याही कामाला शुभकार्यास फळ किंवा देवाचा आशीर्वाद मिळत नाही.
Discussion about this post