Mumbai News : मुंबई : राज्याच्या अनेक भागात तापमान वाढले असून अनेक ठिकाणी पारा ४० अंशांच्या आसपास आहे. अशातच पुढील २० दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या काळात उष्मा इतका वाढण्याची शक्यता आहे की घराबाहेर पडणे कठीण होऊन बसेल.
धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूरमध्ये तीव्र उन्हाळा जाणवण्याची शक्यता आहे. यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणपट्टीतील तापमान तुलनेने सामान्य राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Discussion about this post