व्हीएसआरएस मराठी न्युज –जुना पुणे-मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी निगडीतील भूमीपुत्रांच्या जागा संपादित केलेल्या आहेत. त्याचा अतिशय कमी मोबदला त्यांना देण्यात आलेला आहे. प्रस्तावित पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरु करण्यासाठी ५० मीटर रस्ता रुंदीकरण करण्यात आलेला आहे.
भूमिपुत्र बेघर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, हा मेट्रो मार्ग रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी राज्य शासनाकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, १९८६ ते २००३ दरम्यान पुणे मुंबई महामार्गाचे तीन वेळा रुंदीकरण करण्यात आले. त्यानुसार कमी मोबदला भूमिपुत्रांना देण्यात आला.
या भूमिपुत्रांना नोकरीत समाविष्ट करून घेण्याची गरज आहे. त्यांना महापालिकेकडून गाळे व जागा देण्यात येणार होत्या. ती देखील फाइल भूमी जिंदगी विभागाने मंजूर केल्यानंतर मंत्रालयात धूळ खात पडली आहे. या प्रकल्पासाठी ११,४२५ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. तो देखील दहा पटीने वाढीव खर्च मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्प रद्द न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा काळभोर यांचा निवेदनात देण्यात आला आहे.
Discussion about this post