व्हीएसआरएस न्युज बुलढाणा-
काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी श्री.अतुलभाऊ लोंढे यांची निवड करुन काँग्रेसच्या एका सच्चा सैनिकाला न्याय दिला आहे. २०१४ नंतर देशात आणि राज्यात सत्तांतर हाेवुन भाजपची सत्ता आली. ज्यांना काँग्रेसने माेठे केले अश्या काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, तर काहींनी काँग्रेसमधे राहून ईडी-आणि सीबीआयच्या भितीने भाजपविराेधात बाेलणे जाणिवपूर्वक टाळले.
देशासंह राज्यात भाजपची लाट हाेती. पराभवामुळे काँग्रेसला मरगळ आली हाेती. अश्या कठीण काळात अतुल लाेंढे यांनी ‘फ्रटंफुट’ वर खेळत भाजपला ‘सळाे की पळाे’ करुन साेडले.. भाजपच्या प्रत्येक हल्ल्याचे त्यांनी जशास तसे उत्तर दिले. काँग्रेसची बाजु लावुन धरत त्यांनी भाजपची चुकीचे धाेरणे जनतेसमोर आणली.. टिव्हीवरील डिबेटच्या त्यांच्या व्हिडिओ क्लिप साेशल मिडीयावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत हाेत्या. एक प्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांमधे उत्साह निर्माण करण्याचे काम अतुल लाेंढे यांनी केले. अभ्यासु व्यक्तीमत्व असलेल्या अतुल लाेंढे यांच्यासमाेर कित्येकदा भाजपच्या प्रवक्त्यांची व नेत्यांची बाेलती बंद झाली..आज महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत वाटेकरी जरी असला तरी कठीण काळात काँग्रेस पक्षाची लढाई प्रामाणिकपणे लढणाऱ्या शुर सैनिकाला अर्थात अतुल लाेंढे यांना मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देवुन काँग्रेस नेतृत्वाने खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची दखल घेवुन सन्मान केला. त्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचे मनःपुर्वक आभार आणी श्री. अतुलभाऊ लाेंढे यांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि नव्या ईनिंगसाठी हार्दिक शुभेच्छा.. या निवडीचा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रत्येक सच्चा माणसाला नक्कीच आनंद आहे..!
सिध्दार्थ वानखेडे
माेताळा जि. बुलढाणा
Discussion about this post