Pune News : पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला २१ मार्च रोजी मुंबई बेंगळुरू मार्गावर वाई नजिक अपघात झाला. सुदैवाने आठवले यांच्यासह अन्य कोणालाही यामध्ये इजा झालेली नाही. सर्व सुखरूप आहेत.
आठवले आपल्या गाडीने सातार्याकडून मुंबईकडे येत होते. वाई नजिक त्यांच्या गाडीला एका कंटेनरने धडक दिली. त्यानंतर दुसर्या गाडीतून आठवले मुंबईकडे रवाना झाले.
या अपघाताचे वृत्त कळताच आठवले यांच्या समर्थकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ते सुखरूप असल्याचे वृत्त समजताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
Discussion about this post