व्हीएसआरएस न्युज -मागील वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याची त्यांची अंमलबजावणी चालू करण्यात आली आहे. त्याचे पिंपरी-चिंचवड शहर मावळ पवना धरण क्षेत्रामध्ये परिसर पर्जन्यमान असून पवना धरणामध्ये आज अखेर 90 टक्के पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे.सध्या दिवाळीचा सण आलेला आहे. त्यामुळे सणाच्या काळात शहराला पुरेशा प्रमाणात व नियमित पाणी पुरवठा होण्याची आवश्यकता आहे.
आपण एका बाजूला शहरात 24 × 7 पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करीत आहोत. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत आहोत. आणि पावसाळ्यामध्ये पावसाचे पुरेसे पाणी असूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहोत ही बाब निश्चितच खेदजनक आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा नियमित करावा अशी मागणी नगरसेविका प्रज्ञा महेश खानोलकर यांनी आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की पवना धरणामध्ये पाणी साठा पुरेसा आहे .