Ayodhya News : अयोध्या :
अयोध्या : आजची तारीख ही नव्या कालचक्राची सुरुवात आहे, हजार वर्षांनंतरही देशवासीय ही तारीख कायम स्मरणात ठेवतील. कारण, आज हजारो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संयम, त्याग आणि तपस्या केल्यानंतर आपले राम आले आहेत. या शुभ दिवसाची प्रतीक्षा सर्वांना होती ती आता संपली आहे. आजचा हा प्रसंग अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राममंदिर परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या निमंत्रितांशी संवाद साधताना केले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज 22 जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली.यावेळी ते बोलत होते.
मोदी यावेळी बोलताना ते म्हणाले की, गर्भगृहातील ईश्वरीय चेतनेनंतर मी तुमच्यापुढे आलो आहे आहे. आपले रामलल्ला आता मंडपातराहणार नाहीत ते आता दिव्य मंदिरात राहणार आहेत. माझा विश्वास आहे की, जे आज घडले त्यामुळे देशासह संपूर्ण जगाला रामभभक्तीची अनूभूती होत असेल. आजचा हा प्रसंग अविस्मरणीय आहे.
आजचा दिवस दिव्य आहे. दिवस हजार वर्षांनंतरही लोक लक्षात ठेवतील. सर्वप्रथम मी प्रभू रामांची मी माफी मागतो कारण, आमचा पुरुषार्थ, त्याग, तपश्चा कमी राहिली होती की, आम्ही इतकी वर्षे हे कार्य करू शकलो नाही, आज ती कमी पूर्ण झाली आहे. मला विश्वास आहे, प्रभू राम आज आम्हाला अवश्य क्षमा करतील आणि आशीर्वाद देतील.
प्रभू श्रीरामांनी त्यांच्या जीवनात केवळ १४ वर्षांचा विनवास भोगला होता. आता तर या युगात शेकडो वर्षांचा वनवास त्यांनी सहन केला आहे. आपल्या कितीतरी पिढ्यांनी हा वनवास सहन केला आहे. आज न्यायाची लाज राखली गेली आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, संविधानातील पहिल्या पानावर प्रभू श्रीराम आहेत.प्रभू रामांचं मंदिरही आपण न्यायबद्ध पद्धतीने बांधले आहे.
प्रभू राम भारताच्या प्रत्येक आत्म्याशी जोडलेले आहेत. माझ्या 11 दिवसांच्या उपवासाच्या विधी दरम्यान, मी भगवान श्रीरामाचे पाय ज्या ठिकाणी पडले होते त्या ठिकाणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.काल मी श्री रामाच्या आशीर्वादाने रामसेतूवर होतो. ज्या क्षणी प्रभू श्री राम महासागर पार करायला निघाले तो क्षण काळाचे चक्र बदलून गेला. आता कालचक्र पुन्हा बदलेल आणि शुभ दिशेने वाटचाल करेल.
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले,आज त्रेतायुगात आल्यासारखे वाटत आहे. या क्षणाची वाट गेली पाच शतके या देशाने वाट पाहिली. जिथे मंदिर उभारण्याचा संकल्प केला गेला. तिथेच मंदिर उभारले असून त्यात रामलला विराजमान झाले आहेत. आज भारतातील प्रत्येक शहर, गाव अयोध्याधाम झाले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले,आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही.पण अशा क्षणी पुढील वाटचाल कशी याची जाणीव करून देण्याची जबाबदारी नेहमी माझ्यावर येते. याक्षणी आपली भविष्यातील वाटचाल सर्वसमावेशक असली पाहिजे.राममंदिर तयार झाले आता रामराज्याची निर्मिती झाली पाहिजे. अयोध्येत कोणताही वाद नाही. असता कामा नये.
पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मी पंतप्रधान मोदींना खूप दिवसांपासून ओळखतो. त्यांनी ही प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कडक तपाचरण केले.मोदी हे तपस्वी आहेत.
Discussion about this post