व्हीएसआरएस मराठी न्युज -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या जिल्ह्यात भाजपशी युती केली . त्यामुळे अनेक पंचायत समित्यांमध्ये संख्याबळ अधिक असूनही नानांच्या जिल्ह्यात काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले .
यावरून नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खूपसल्याचे ट्विट केले . यावर आम्हाला शत्रू सामोरचा परवडतो पण दोस्ती करायची असेल तर प्रामाणिकपणाने करावी , अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले .
यावेळी मालेगावमध्ये ही आमच्या आमदाराला घेऊन गेले . अनेकदा सूचना दिल्या पण काल भंडारा गोंदीयामध्ये युती करून राष्ट्रवादीने आम्ही सत्तेचे पीपासू आहोत . आम्हाला कोणाचा ही संबंध नाही . काँग्रेस आमचा विरोधक आहे , अशा पध्दतीची भूमीका त्यांच्या कृतीतून पहायला मिळाली . म्हणून मला आज ते ट्विट करावे लागले . राष्ट्रवादी काँग्रेसने पाटीत खंजीर खूपसला असे म्हटले आहे . आम्हाला दूश्मन सामोरचा परवडतो पण दोस्ती करायची असेल तर प्रामाणीक करावी ही भूमीका काँग्रेसची आहे . मी आमच्या हायकमांडला जाऊन ही गोष्ट अवगत करणार आहे . राष्ट्रवादी काँग्रेसवर कशी कूरघोडी करते याच्यावरची भूमीका आम्ही आमच्या हाय कमांकडे मांडू , असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले .
यावेळी त्यांना जयंत पाटील यांच्या आवाहना विषयी विचारले असता , एकीकडे पाटीत खंजीर खूपसायचा आणि आम्ही टोकाची भूमीका घ्यायची नाही . त्यांना राजकारण करायचे आहे . त्यांना त्यांची पार्टी वाढवायची आहे आम्ही त्याना मदत करायला आलो असे नाही . संगळ्यांना आपली पार्टी मोठी करायचा अधीकार आहे . मात्र , याचा अर्थ असा नाही , असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले .
Discussion about this post