व्हीएसआरएस न्युज पुणे : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे.
या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले आहे. बैलगाडा शर्यतबंदी विरोधात असताना राजकीय नेतेही एकत्र येत आहेत. ही बंदी उठविण्यासाठी राजकीय नेते नियोजन करीत आहेत.
याबाबत आज सांयकाळी ओझर येथे बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीचे निमंत्रण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले आहे. यानिमित्ताने एकमेकांचे विरोधक एकत्र येऊन बैलगाडा शर्यंत विरोधात लढा देतील का, हे लवकरत समजेल. बैठकीचं निमंत्रण डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांना फोनवरुन दिले आहे.
”कुठलाही पक्षभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय आड येता कामा नये. सर्वांनाच बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवायचा,” अशी भूमिका घेत आढळरावांना स्वतः कॉल करुन बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी नव्याने रणनिती आखण्यासाठीच्या आजच्या बैठकीत सहभागी होण्याची विनंती कोल्हे यांनी केली. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आढळराव उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपली वेळ घेऊन आपल्याकडे चर्चेसाठी येतो, असे कोल्हे यांनी सांगितले.
Discussion about this post