व्हीएसआरएस मराठी न्युज –जामनेर तालुक्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाजाच्या महाकुंभाचा समारोप सोमवारी झाला.त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. बळकट अर्थव्यवस्था असलेला भारत जगात पाचव्या क्रमांकावर असून, नजीकच्या काळात तिसर्या क्रमांकाकडे पोहोचेल यात शंका नाही, असेही त्यांनी सांगितले.व्यासपीठावर पोहरागडदेवी संस्थानचे गादीपती बाबूसिंगजी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक भय्या जोशी, स्वामी श्यामकुमार महाराज, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समितीचे प्रमुख शरदराव ढोले आदी संत उपस्थित होते.
महाकुंभ २५ ते ३० जानेवारीदरम्यान झाला. रोज महाकुंभात सहभागी होणार्या समाजबांधवांसह संत-महंत व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मंगळवारी (२४ जानेवारी) कुंभस्थळापासून धर्मस्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती. यात ३० हजारांपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले होते. हेलिकॉप्टरद्वारे शोभायात्रेत पुष्पवृष्टी करण्यात आली. सोमवारी दोन लाखांपेक्षा अधिक भाविक महाकुंभस्थळी आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे बुधवारी (२५ जानेवारी) रात्री अवकाळी पाऊस होऊनही गुरुवारी (२६ जानेवारी) बहुसंख्येने भाविक कुंभस्थळी आले होते.दरम्यान, दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाकुंभात आगमन अपेक्षित असताना खराब हवामानामुळे विमान जळगाव येथे पोहोचू शकले नाही, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
Discussion about this post