व्हीएसआरएस मराठी न्युज -सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर गेले दहा महिने लटकत असलेली टांगती तलवार नुकतीच दूर केल्यानंतर ते अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी 119 एसीपींच्या (डीवायएसपी) बदल्या काल केल्या.तसेच न्यायालयाकडून दिलासा मिळालेल्या सरकारने तीन वर्षे रखडलेल्या 143च्या पीआयंना सुद्धा बढत्यांचा सुखद धक्का दिला.
सोमवारी (22 मे) गृह विभागाने 143 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देऊन सुखद धक्का दिला.
पिंपरी-चिंचवडमधून (PCMC) बदली झालेल्या तीन तरुण एसीपींतील प्रेरणा कट्टे (चाकण) आणि प्रशांत अमृतकर (गुन्हे शाखा) यांची अनुक्रमे चिमूर (चंद्रपूर) आणि गडचिरोलीचे डीवायएसपी म्हणून करण्यात आली आहे.कट्टे यांच्याकडे तळेगाव दाभाडे (ता.मावळ) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी किशोर आवारे यांच्या 12 मे रोजी झालेल्या व मोठी खळबळ उडवून दिलेल्या हाय प्रोफाईल खूनाचा तपास होता. त्यात स्थानिक आमदारांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. त्यांची अचानक बदली झाल्यामुळे या तपासाला काहीशी खीळ आता बसणार आहे.शहरातील तिसरे एसीपी (वाकड) श्रीकांत दिसले यांची नंदुरबारचे डीवायएसपी म्हणून बदली झाली आहे.
बदली झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील तीन एसीपींच्या जागी बाहेरून तीन डीवायएसपी आले आहेत.सातारा ग्रामीणचे विशाल हिरे,अक्कलकोट,सोलापूरचे राजेंद्रसिंह गौर आणि गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआय़डी) पुणे येथील बाळासाहेब यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज शहर पोलिस दलातीलच पीआय विठ्ठल कुबडे यांना बढतीवर शहरातच ठेवण्यात आले आहे. त्यांच्याजो़डीने तीश कसबे हे आणखी एक अधिकारी प्रमोशनवर शहरात आले आहेत.म्हणजे शहरातून बदली झाले तीन एसीपी आणि मिळाले,मात्र पाच आहेत.त्यामुळे काही एसीपींकडील पदभार कमी होणार आहेत.
Discussion about this post