व्हीएसआरएस न्युज मोदी सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे होणारे मोफत रेशन वितरण वाढवण्याचा आता कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
केंद्राचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला ताण कमी करण्याच्या हेतुने मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा करण्यात आली होती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत ओळखल्या गेलेल्या 80 कोटी शिधा पत्रिकांना सरकार या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन पुरवत आहे.
30 नोव्हेंबरनंतर या योजनेचा विस्तार करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं पांडे यांनी सांगितलं आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्नधान्याची विल्हेवाट चांगली झाली, शिवाय आता अर्थव्यवस्थाही सुधारत असल्याने योजनेचा विस्तार करत नसल्याचं स्पष्टीकरण पांडे यांनी दिलं आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे लाभार्थ्यांना कोरोना काळात मोफत अन्नधान्याची सोय झाली आणि लाभार्थ्यांना अन्न सुरक्षाही मिळाली. रेशनकार्डधारक असलेले 80 लाखांहूनही अधिक लोक या योजनेसाठी लाभार्थी आहेत. फक्त रेशन कार्ड नसलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
Discussion about this post