व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -8 डिसेंबर रोजी पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील एका मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. सोमवारी एका अधिकाऱ्याने माहिती दिली की या आगीच्या घटनेत मरण पावलेल्यांची संख्या 14 झाली आहे.
तळवडे येथील या कारखान्याचे मालक शरद सुतार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात तोही भाजला. जखमींपैकी कमल चौरे (३५) या महिलेचा शनिवारी मृत्यू झाला, तर उषा पाडवी (४०) यांचा रविवारी मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. कारखाना सामान्यत: वाढदिवसाच्या उत्सवात वापरल्या जाणार्या मेणबत्त्या जात होत्या.
8 डिसेंबर रोजी दुपारी मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात अचानक आग लागली, त्यात त्याच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला, तर अन्य 10 जण या अपघातात गंभीर जखमी झाले. नंतर यातील काही लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी एका अधिकाऱ्याने सांगितले की मृतांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे.
तळवडे घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले होते, तसेच पंतप्रधान साहाय्यता निधी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही साहाय्य करण्याविषयी सूचना दिल्या होते,त्यांची अंमलबजावणी करण्यात आली नाही असे आरोप सचिन काळभोर यांनी केले आहे.
तळवडे आग दुर्घटना झाल्यानंतर सुद्धा महानगरपालिका प्रशासन गप्प बसले असून भंगार माफिया ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात आली नाही चिखली मोशी तळवडे निगडी भागात भंगार माफिया मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असून करोडो रुपये किमतीचे भंगार गोळा करून विल्हेवाट लावण्यात येत असून त्या मुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठीचा प्र्स्ताव लवकरता लवकर देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.
त्यानंतर देशमुख यांनी पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदारांना याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश दिले होते. हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून शिंदे यांच्या सुचनेनुसार सर्व मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात यावेत असे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहितीही देशमुख यांनी या वेळी दिली.
Discussion about this post