व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -खासदार संभाजी राजे मराठा समाजाच्या आरक्षण आणि विविध प्रमुख मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.
सरकारला त्यांनी दोन महिन्यांपुर्वी काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत, त्यामुळे संभाजी राजे गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
आज सकाळी वर्षा बंगल्यावर मराठा समन्वयक चर्चेसाठी गेले होते. त्यानंतर चर्चा करुन आल्यानंतर समन्वयकांनी छत्रपतींशी चर्चा केली. बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, अमित देशमुख हे संभाजी राजेंना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा मला आनंदाने सांगायचे आहे. ज्या मागण्या आम्ही ठेवल्या होत्या त्या मान्य झाल्या असल्याचं संभाजी राजे म्हणाले आहेत.
दरम्यान मागे थोड्यावेळा पुर्वी बोलतना संभाजी राजे म्हणाले होते की आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. मी तीन दिवसांपासून काही खाल्ले नाही, मी बाकीच्यांसारखा मागे जाऊन ज्यूस पिणारा नाही, माझं रक्त तसं नाहीये असं छत्रपती म्हणाले. तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेतले आहे. लहान मुलाच्या हातून ज्यूस पिऊन संभाजी राजेंनी उपोषण मागे घेतले आहे.
सामान्य गरिबांचे प्रश्न सुटायला हवे. यासाठी आम्ही आंदोलन केले. समन्वयकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सरकारने 2 महिन्यांचा वेळ मागितला होता तो संपला परंतु आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही म्हणून आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. समन्वयकांनी चर्चा केली असल्याचे राजे म्हणाले आणि जोपर्यंत लेखी काही मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असंही संभाजी राजे म्हणाले होते. परंतु आज झालेल्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत
Discussion about this post