व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
1 जुलै पासून दमदार पावसाला सुरुवात झाली. झपाट्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे वाढीव पाणीकपात टळली.(Pavana Dam) परंतु, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला. आजमितीला धरणात 99.98 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
Discussion about this post