व्हीएसआरएस मराठी न्युज -महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा संदर्भातील एक मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झालेली आहे. या सुनावणी नंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय उद्याच लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू असून न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल प्रलंबित ठेवला होता. मात्र आता या प्रकरणाचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची धाकधूक वाढली आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान “उद्याचा दिवस हा प्रचंड कामाचा असणार आहे, .उद्याच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ देशातील दोन मोठ्या प्रकरणाचा निकाल देणार आहे..” मोठं वक्तव्य केलेलं आहे.
यातील दोन मोठ्या प्रकरणा पैकी एक प्रकरण हे दिल्ली सरकार विरुद्ध उपराज्यपाल असे आहे तर दुसरे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचे असणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे.
Discussion about this post