व्हीएसआरएस मराठी न्युज –जून महिन्याचे 11 दिवस झाले तरी, अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही;
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दररोज 500 एमएलडी पाणी उचलले जाते. ते पाणी शुद्ध करून पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जात आहे. कडक उन्हामुळे पवना धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्फीभवन होत आहे. त्यामुळे पाण्याचा साठा वेगात कमी होत आहे. धरणातील साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने जमीन उघडी पडल्याचे दिसून येत आहे.
पवना धरणात रविवारपर्यंत केवळ 21.46 टक्के इतका पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेल इतका आहे.
Discussion about this post