व्हीएसआरएस मराठी न्युज –जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढील महिन्यात 21 जून ला शहरात येत आहे.
दरवर्षी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असतो या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस चे शहाराध्यक्ष अजित गव्हाणे , राष्ट्रवादी चे सरचिटणीस इखलास सय्यद, महिला उपाध्यक्ष आशा शिंदे, महिला सरचिटणीस विमल गायकवाड यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन पालखी आगमनापूर्वी आकुर्डीतील विविध विकास कामे मार्गी लावावीत यासाठी भरीव तरतूद करावी अशी मागणी लेखी निवेदन देऊन केली आहे
निवेदना मधील मुद्दे
येत्या २१ जून रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी आकुर्डी येथे येत आहे. सदर पालखी येण्यापूर्वी प्रभागातील स्थापत्य व आरोग्य विषयक तसेच इतर किरकोळ कामे होणे आवश्यक आहे. परंतु ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालयाकडे आर्थिक तरतूद नसल्याने कामांना चालना मिळत नाही.
यासाठी आम्ही स्वतः २८ मार्च, ११ एप्रिल, व २५ एप्रिल २०२२ रोजी ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालय मुख्य समन्वयक तथा शहर अभियंता मा. श्रीकांत सावने सो यांना पत्राद्वारे संपर्क साधून सूचित केले आहे.
त्या प्रमाणे काही अंशी कामे झाली आहेत. परंतु स्थापत्य विषयक अद्यापही काही कामे करणे आवश्यक आहे परंतु तरतूद नसल्याने कामे पूर्ण झाली नाही. तरी आगामी पालखी सोहळा पाहता पालखीचे पूर्व तयारी म्हणून वारकरांसाठी निवास, मांडप, यासह परिसरातील स्थापत्य विषयक कामांसाठी त्वरित तरतूद मिळणे बाबत विचार व्हावा. म्हणजे ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून उर्वरित कामे करून घेता येईल.
तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खालील कामांना गती द्यावी
१) पालखी बरोबर येणाऱ्या दिंड्याची निवासी व्यवस्था करण्यात यावी.
२) सदर दिवशी पिण्याच्या पाण्याचे टँकरची व्यवस्था करण्यात यावी.
३) पालखी बरोबर येणारे वारकरी व भक्तांसाठी ‘ फिरते शौचालय ‘ विविध ठिकाणी उभी करण्यात यावी.
४) भटक्या श्वानांचा बंदोबस्त व रस्त्यावरील खड्डे बुजविणे.
५) प्रभाग क्र. २१ ची संपूर्ण स्वछता तसेच जागो – जागी पावडर व औषध फवारणी मारणे.
६) सायंकाळचा पाणी पुरवठा सुरु ठेवणे.
७) विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता घेणे बाबत विद्युत विभाग सतर्क ठेवणे तसेच महावितरण विभागाशी संपर्क साधने.
८) सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वछता करणेकरिता चोवीस तास सोय करणे
९) पालखी नंतर दि. २३ जुन २०२२ रोजी संपूर्ण प्रभाग स्वछ करणे बाबत आरोग्य विभागाला सूचित करणे.
कोरोना महामारीच्या संकटा नंतर सुमारे दोन वर्षा नंतर मोठ्या प्रमाणात सोहळा होण्याची शक्यता ग्राह्य धरून कृपया वरील सोयी सुविधा उपलब्ध होणे बाबत विंनती आहे.
Discussion about this post