व्हीएसआरएस न्युज पिंपरी चिंचवड :- यमुनानगर भागातील विज गेली एक वर्ष झाले सतत दिवसातून दोन तास बंद असते.नगरसेवक उत्तम केंदळे यांनी महावितरण अधिकाऱ्याला फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे देत असत.त्यामुळे केंदळे यांनी कंटाळून नागरिकांना आव्हान केल की “जसे नगरसेवक म्हणून आपण मला विजेच्या प्रश्नाबाबत विचारना करता तसीच विचारणा महावितरण अधिकाऱ्याला आपण एसएमएस द्वारे करा” या आव्हानाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांना भरमसाठ वीजबिले आलीत. याबाबत ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीजबिले माफ करण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र, कोणाचीच वीजबिले रद्द करण्यात आलेली नाहीत.यमुनानगर भागातील विज गेली एक वर्ष झाले दिवसातून दोन तास बंद असते.या भागातील नागरिक विज बंद राहत असल्यामुळे हैराण झाले आहेत.नगरसेवक केंदळे यांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही पुणे महावितरण विभागाचे मुख्य अधिकारी पंकज तगलपल्लेवार झोपेचे सोंग घेत होते.त्यामुळे झोपलेल्या अधिकाऱ्याला जाग करण्यासाठी त्यांनी नागरिकांना एस एम एस द्वारे जाब विचारण्यासाठी आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला यमुना नगर भागातील जवळपास दोन हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला.
अधिकाऱ्याला एसएमएस गेले असता अधिकाऱ्याने केंदळे यांना फोन करून नागरिकांना नंबर का दिला विचारणा केली.त्यावेळी केंदळे म्हणाले नागरिक मलाही फोन करून ऑनलाईन क्लासेस चालू असताना वीज गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे,अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे असे प्रश्न विचारत असतात.काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींचे विजेवर चालणारे छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत याला जबाबदार कोण?यापुढे विजेच्या बाबतीत कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला आपण जबाबदार असाल असा इशाराही केंदळे यांनी महावितरण अधिकाऱ्याला दिला आहे.
Discussion about this post